मी तुला गृहीत धरून बसलो,
आयुष्यात एकदाच पण शेवटचा फसलो !
मी कधी मांडली नव्हती गणिते आपल्या सोबतीची ,
सोबत मात्र शेवटपर्यंत असेल अश्या भ्रमात राहिलो !
तशी सोबतीची सवय जडली होती ,
उगाच नको त्या गोष्टींमध्ये तुला शोधत बसलो !
आता काय उगीच शब्द बापुडे व्यर्थ जातील ,
मी मला हरवले , स्मशानात शोधत राहिलो !
हातास काही लागत नाहिये बराच वेळ झाला ,
मी वेडापीर म्हणुन जगत राहिलो अन् दगड झेलत राहिलो !
प्रसाद जोशी
22.05.2009
पुणे
No comments:
Post a Comment