माता !
कुणाला लक्ष्मणाच्या आईचं नाव आठवतयं काहो ?
वनवासाला जाताना तिनंही फोडला असेल टाहो !
लक्ष्मणाची उर्मिला आठवते कधी का कुणाला ?
लवकुशासारखे मूल व्हावे वाटले असेल नां तिला !
मात्रुत्वाचा अपमान झाला म्हणुन धरित्रिने सीतेला उदरात घेतले ,
जीवंतपणी अनेक मृत्यु उर्मिलेने भोगले !
जीव दशरथाचा जडला , कैकयीला एक वर दिधला ,
माता होती वर वापरला , कोपून तिच्यावरी भरत मात्र चुकला !
तिचे देणे वात्सल्याचे होते यात मुळी शंकाच नाही मजला
मांगल्य होते की नव्हते या निर्णयाचा हक्क नाही आपुला !
2)
राधेय !
वरदान लाभले तिजला , पण शाप सोबती जडला ,
तो आला जरी जन्मास , सोडुनी त्यास तिने दिधला !
मग तपे लोटली अनेक , जीव व्याकुळच राहिला ,
दान दिले न मातेचे , लागले दान मागायला !
पुत्र तिचा तो थोरच ठरला , दिल्या दानाला जागला
पाच पुत्र तसेच राहिले , चक्र अन् प्राण मात्र रुतला !
काय कहाणी कशी विराणी त्या कुंती मातेची
कुणी न पुसले अश्रुही थिजले , राधेला कुणीना पुसले !
गेल्यावरती प्रश्न न उरला , तो कौन्तेय की राधेय ,
त्या तीरावरती अर्घ्य सुद्धा न त्यास कुणी निधला !
जरी जन्मला कुंतीपोटी , जीव राधेचा होता ,
प्रश्नच न उरला तो कौन्तेय की राधेय , पुत्र राधेचा निजला !
प्र ......... साद जोशी
पुणे
३१.०५.२००९
3)
चार चक्रे घुमती त्या मिश्रणाकरीता
पाउल पड़ते पुढे घमेले टाकण्याकरीता
लक्ष मात्र तिचे त्या झोळीकड़े फिरता
हलकेच पान्हा ओथंबतो त्या पिलाकरिता !
मग मुकदमाची हाक , फिरते पाउल मागे
पदर भिजुनिया जातो , लक्ष न कामात लागे
राहून जाते देणे , दाण्याची आग पोटात
वात्सल्याचे मांगल्य होते , दिसती दोन घास ओठात !
जात न उरते पात न उरते , ध्यास तिचा घास कमवणे
उरते फक्त भुकेची आग , घमेली ओतीत जाणे
ओठातली रेती , पोटातच जाते उरते दुर्लक्ष करणे
ममत्व सारे उरीच शमते , मग कसे स्मरावे वात्सल्याचे देणे !
प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९
4)
एका उनाडश्या कोपरयावर
त्या चार खान्म्बानमधून फिरत होतो उगीचच ,
राखेतुनी तिला शोधीत होतो उगीचच !
गुरूजी आले , मुठभर राख अन् अश्म घेवुन चला म्हणाले ,
आठवणीन्ची राख होत नाही , सगळ्या लोकांना पुढे व्हा म्हणालो !
एका उनाडश्या कोपरयावर चहा बिडी , तिने जाताना नक्की पाहिलं होतं
मी मानसिक तयारी करून गेलो , ताट आवडीच्या पदार्थांनी सजलं होतं !
जेवण झालं , खूप मज्जा आली , समोर सिगरेटचं पाकीट होतं ,
ती आई होती , समजुन सुद्धा न समजल्या सारखं वागणं तिला अवगत होतं !
श्वास कुणाच्या हातात नसतो म्हणतात , चुकीचं आहे ,
ती नळी काढायची की ठेवायची विचारलं , श्वास माझ्या कुडीचा आहे !
निर्णय कठोर होवून घ्यावाच लागतो , चुकीचं आहे ,
ती जगावी की जावी , हे तिच्या ती आयुष्याचं देणं आहे !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
आईचं जगणं त्या नळीवर अवलंबून होतं !
तिथेपण तिनं मला अड़वलं नाही , निर्णय मला घ्यावाच लागला नाही ,
निघून गेली अलगद कळलं सुद्धा नाही , देणं देण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही !
एक बोचणी कायमची राहिली माझ्या उरात ,
कधीच कुणाला कळली नाही !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
तिचं असं जाणं माझचं मला पटलं नाही !
प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९
5)
राखेतुनी तिला शोधीत होतो उगीचच !
गुरूजी आले , मुठभर राख अन् अश्म घेवुन चला म्हणाले ,
आठवणीन्ची राख होत नाही , सगळ्या लोकांना पुढे व्हा म्हणालो !
एका उनाडश्या कोपरयावर चहा बिडी , तिने जाताना नक्की पाहिलं होतं
मी मानसिक तयारी करून गेलो , ताट आवडीच्या पदार्थांनी सजलं होतं !
जेवण झालं , खूप मज्जा आली , समोर सिगरेटचं पाकीट होतं ,
ती आई होती , समजुन सुद्धा न समजल्या सारखं वागणं तिला अवगत होतं !
श्वास कुणाच्या हातात नसतो म्हणतात , चुकीचं आहे ,
ती नळी काढायची की ठेवायची विचारलं , श्वास माझ्या कुडीचा आहे !
निर्णय कठोर होवून घ्यावाच लागतो , चुकीचं आहे ,
ती जगावी की जावी , हे तिच्या ती आयुष्याचं देणं आहे !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
आईचं जगणं त्या नळीवर अवलंबून होतं !
तिथेपण तिनं मला अड़वलं नाही , निर्णय मला घ्यावाच लागला नाही ,
निघून गेली अलगद कळलं सुद्धा नाही , देणं देण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही !
एक बोचणी कायमची राहिली माझ्या उरात ,
कधीच कुणाला कळली नाही !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
तिचं असं जाणं माझचं मला पटलं नाही !
प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९
5)
वात्सल्य की मातृत्व
कदाचीत तिच्या ओटीत कधी मात्रुत्वाचं देणं नव्हतं ,
वात्सल्याची तिच्याकडे कधी कमी नव्हती !
हे देणं मागावं तर कुणाकड़े अन् कसं ?
आपल्या लोकांनी दिलं तर ते दान कसं ?
एक दिवस तिच्या नजरेस ती पडली ,
खंतावनारी नजर तिची पटकिनी खुलली !
मागणे न लाजता तिने मागुन टाकले ,
यशोदे रुच्यापाने होसुद्धा तिने म्हणुन टाकले !
मग मात्र सुरु झाले मात्रुत्वाचे खेळ ,
दिवस तिला गेले हिला पुरत नव्हता वेळ !
मग एकदाची ती वेळ आली ,
मूर्तिमंत दान देण्याची वेळ तिच्यावर आली !
तराजू आता अचानक एका बाजूला कलायला लागला ,
वात्सल्य की मातृत्व यांचा लढा वाढायला लागला !
वात्सल्यानी पोट भरणार नाही याची खात्री होती तिला ,
देणं देण्याची वेळ आली हे काही मान्य होत नव्हते तिला !
वात्सल्य अन् मातृत्व अता कागदोपत्री आलं ,
त्या पिल्लाचं मात्र एक खेळणे झाले !
दोन दिवसांचा जीव मुक्यानेच बोलू लागला ,
मला दोन आया आहेत असे जगाला सांगू लागला !
तिला अन् हिला त्याची भाषा काही कळत नव्हती ,
त्याला यांची तगमग अत्ता समजणार नव्हती !
वात्सल्याचं देणं मोठं की मात्रुत्वाचं यावर एकमत होतं नव्हतं ,
भुकेसाठी कुठे पहावं त्याला कळत नव्हतं !
मग मात्र एकदा त्याचा टाहो कुणालाच ऐकू आला नाही ,
भांडणाच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नाही !
वात्सल्य की मातृत्व याचा वाद काही संपेना ,
देवानं दिलेलं देणं कधी परत वाटेवर गेलं कुणालाच उमगेना !
आता फ़क्त काहूर उरलं ,
देणं की घेणं सर्वच संपलं !
मातृत्व तर त्याचक्षणी कोलमडलं ,
वात्सल्याचं देणं द्यायचंच राहून गेलं !!!
प्रसाद जोशी
पुणे
२३.०५.२००९
वात्सल्याची तिच्याकडे कधी कमी नव्हती !
हे देणं मागावं तर कुणाकड़े अन् कसं ?
आपल्या लोकांनी दिलं तर ते दान कसं ?
एक दिवस तिच्या नजरेस ती पडली ,
खंतावनारी नजर तिची पटकिनी खुलली !
मागणे न लाजता तिने मागुन टाकले ,
यशोदे रुच्यापाने होसुद्धा तिने म्हणुन टाकले !
मग मात्र सुरु झाले मात्रुत्वाचे खेळ ,
दिवस तिला गेले हिला पुरत नव्हता वेळ !
मग एकदाची ती वेळ आली ,
मूर्तिमंत दान देण्याची वेळ तिच्यावर आली !
तराजू आता अचानक एका बाजूला कलायला लागला ,
वात्सल्य की मातृत्व यांचा लढा वाढायला लागला !
वात्सल्यानी पोट भरणार नाही याची खात्री होती तिला ,
देणं देण्याची वेळ आली हे काही मान्य होत नव्हते तिला !
वात्सल्य अन् मातृत्व अता कागदोपत्री आलं ,
त्या पिल्लाचं मात्र एक खेळणे झाले !
दोन दिवसांचा जीव मुक्यानेच बोलू लागला ,
मला दोन आया आहेत असे जगाला सांगू लागला !
तिला अन् हिला त्याची भाषा काही कळत नव्हती ,
त्याला यांची तगमग अत्ता समजणार नव्हती !
वात्सल्याचं देणं मोठं की मात्रुत्वाचं यावर एकमत होतं नव्हतं ,
भुकेसाठी कुठे पहावं त्याला कळत नव्हतं !
मग मात्र एकदा त्याचा टाहो कुणालाच ऐकू आला नाही ,
भांडणाच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नाही !
वात्सल्य की मातृत्व याचा वाद काही संपेना ,
देवानं दिलेलं देणं कधी परत वाटेवर गेलं कुणालाच उमगेना !
आता फ़क्त काहूर उरलं ,
देणं की घेणं सर्वच संपलं !
मातृत्व तर त्याचक्षणी कोलमडलं ,
वात्सल्याचं देणं द्यायचंच राहून गेलं !!!
प्रसाद जोशी
पुणे
२३.०५.२००९
No comments:
Post a Comment