ओळख !
तुम्ही कायम अश्याच वागता कां ? की फ़क्त अनोळखी लोकान्शीच न बोलता राहता ?
अनोळखी म्हणाल तर आपण एकमेकांना गेले दोन तास पाहतोय हो नाही कां ?
लाजली नाही बुजली ती , काहेच न बोलता हलकेच निघून गेली ती दुसरया वर्गात
मी तालीम घ्यायचो त्याच कॉलेज मध्ये तिच्याच मित्रांची नाटकासाठी तिसरयाच वर्गात !
तिची सुद्धा तालीम सुरु होती , आमच्या तालमीला तिचे सूर लाभायाचे
सर्वजण तालमीत गुंग असताना मी मात्र फ़क्त तिलाच ऐकायचो
कॉलेज मधला एकेक दिवस उगाचच सरायला लागला
तिच्या खळितल्या हसण्यात जीव गुन्तायला लागला !
मी होतो एक खुशालचेंडू , ती कायम गंभीर
विचारू कसं प्रेमाचं ? मन होतं नव्हतं खंबीर
मनापासून मनाला समजावलं ,एकदाचं विचारून टाकलं
काय सांगू मित्रांनो , आयुष्यातलं शेवटचं आश्यर्य घडलं !
तिनं हो म्हटलं आणि जग होत्याचं नव्हतं झालं
प्रेम करावं कसं हे मलाही समजू लागलं
प्रत्येक गोष्ट आता तिला पहिले समजायची
मग कधीतरी मलाच माझी ती थोडीशी उमगायची !
हे थोडेसे उमगणे नंतर नंतर कोडे वाटू लागले
कोडे सुटता सुटत नाही म्हणुन दोर सैल होऊ लागले
तिला खोटं आवडायचं नाही मला कधी समजले नाही
तिला त्रास नको म्हणुन मी संपूर्ण खरं म्हणुन बोलायचो नाही !
सुरुवात जरी मी केली तरी शेवट तिच्याच हातात होता
वीण अशी उसवून टाकली की दोरही माझ्या हाती नव्हता
सर्व काही संपल्याचा फ़क्त एक निरोप आला
उत्तर सुद्धा न घेता निरोप देणारा गेला !
आज अनेक वर्षांनी परत एकदा गाठ पडली
तिला कोडी सोडवायची होती घाई जडली
मी पण आता गुंतलो होतो माझ्या संसारात
परत कुणाला फसवावे जमणार नव्हते जन्मात
मी सगळ्या चूका माझ्याच म्हणुन सांगितल्या
शेवटचे खोटे बोललो , तिच्या भावना आवरल्या
एक खोट्या बोलण्यानी सर्व मार्गावर आले
दोन जीवांसाठी दोन संसार मोलाचे ठरले !
आजही आम्ही कधी मधी समोर येतो
ओळखतो एकमेकांना एवढेच दाखवतो
ती आता तिच्या मुलात मला शोधते , अन् जवळ घेते
माझ्याही बायकोला भेटली तर , तिच्या खांद्यावर देते !
नक्की चुकले कुठं याचा विचार आता मी करत नाही
मला त्रास होतोय याचा हे सुद्धा कुणाला समजू देत नाही
कळ जाते कधीतरी एकदाच एकदम जीवघेणी
आरशात पाहतो मी माझीच नजर केविलवाणी !
प्र...............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९
तुम्ही कायम अश्याच वागता कां ? की फ़क्त अनोळखी लोकान्शीच न बोलता राहता ?
अनोळखी म्हणाल तर आपण एकमेकांना गेले दोन तास पाहतोय हो नाही कां ?
लाजली नाही बुजली ती , काहेच न बोलता हलकेच निघून गेली ती दुसरया वर्गात
मी तालीम घ्यायचो त्याच कॉलेज मध्ये तिच्याच मित्रांची नाटकासाठी तिसरयाच वर्गात !
तिची सुद्धा तालीम सुरु होती , आमच्या तालमीला तिचे सूर लाभायाचे
सर्वजण तालमीत गुंग असताना मी मात्र फ़क्त तिलाच ऐकायचो
कॉलेज मधला एकेक दिवस उगाचच सरायला लागला
तिच्या खळितल्या हसण्यात जीव गुन्तायला लागला !
मी होतो एक खुशालचेंडू , ती कायम गंभीर
विचारू कसं प्रेमाचं ? मन होतं नव्हतं खंबीर
मनापासून मनाला समजावलं ,एकदाचं विचारून टाकलं
काय सांगू मित्रांनो , आयुष्यातलं शेवटचं आश्यर्य घडलं !
तिनं हो म्हटलं आणि जग होत्याचं नव्हतं झालं
प्रेम करावं कसं हे मलाही समजू लागलं
प्रत्येक गोष्ट आता तिला पहिले समजायची
मग कधीतरी मलाच माझी ती थोडीशी उमगायची !
हे थोडेसे उमगणे नंतर नंतर कोडे वाटू लागले
कोडे सुटता सुटत नाही म्हणुन दोर सैल होऊ लागले
तिला खोटं आवडायचं नाही मला कधी समजले नाही
तिला त्रास नको म्हणुन मी संपूर्ण खरं म्हणुन बोलायचो नाही !
सुरुवात जरी मी केली तरी शेवट तिच्याच हातात होता
वीण अशी उसवून टाकली की दोरही माझ्या हाती नव्हता
सर्व काही संपल्याचा फ़क्त एक निरोप आला
उत्तर सुद्धा न घेता निरोप देणारा गेला !
आज अनेक वर्षांनी परत एकदा गाठ पडली
तिला कोडी सोडवायची होती घाई जडली
मी पण आता गुंतलो होतो माझ्या संसारात
परत कुणाला फसवावे जमणार नव्हते जन्मात
मी सगळ्या चूका माझ्याच म्हणुन सांगितल्या
शेवटचे खोटे बोललो , तिच्या भावना आवरल्या
एक खोट्या बोलण्यानी सर्व मार्गावर आले
दोन जीवांसाठी दोन संसार मोलाचे ठरले !
आजही आम्ही कधी मधी समोर येतो
ओळखतो एकमेकांना एवढेच दाखवतो
ती आता तिच्या मुलात मला शोधते , अन् जवळ घेते
माझ्याही बायकोला भेटली तर , तिच्या खांद्यावर देते !
नक्की चुकले कुठं याचा विचार आता मी करत नाही
मला त्रास होतोय याचा हे सुद्धा कुणाला समजू देत नाही
कळ जाते कधीतरी एकदाच एकदम जीवघेणी
आरशात पाहतो मी माझीच नजर केविलवाणी !
प्र...............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९
No comments:
Post a Comment