आठवणी मेणबत्ती सारख्या
हातात घेवून फिरत रहातो
उजेड जगाला देतो
चटके हाताला घेतो
हीच साठवण आहे
तुझ्या आठवाची
जगणे जगत रहातो
मरण पेलत जगतो
उपयोग नाही कशाचाच
सर्व काही व्यर्थ आहे
जखम भाळी घेवूनच
अश्वत्थामा अमर आहे
प्र....साद जोशी
पुणे
०४.०७.२००९
No comments:
Post a Comment