नव्हती आशा बदलाची कधीच कुणाला,
मलाही होती शंका जो वरी बाबा नाही भेटला !
मी म्हणालो त्याला मी प्रयत्न करीनच,
हसला अन् म्हणाला हे ही दिवस जातीलच !
कृपा असावी असे नव्हते कधी वाटले,
त्याचा हात फिरता अश्रु मात्र सांडले !
म्हणाला मला मान मागुन मिळणार नाही,
स्वत:हुन द्यावे मग अपमान नाही !
स्वत: द्यायची सवय कधीच नव्हती,
हात उठतो कशाला याची जाणीव मात्र होती !
अशक्याचे शक्य होते हे त्यानेच दावले,
मदतीचे हात अनेक पुढे आले !
विश्वास बसेना माझ्याच नयनावर,
भीड़ चेपली करू स्वत: लागल्यावर !
नाणे दोन बाजुंचे असते अशी समजूत होती,
दान आपलेसुद्धा पडेल याची कायम भीती !
आरसा दाखवेल कुणी माझा मला सुधारलेला,
यावरी विश्वास बसायला मात्र वेळ गेला !
बदल घडेल माझ्यात कधी असे कधीच नव्हते वाटले,
दुसरेही विसम्बले मदतीकरीता अश्रु डोळा दाटले !
प्रत्येकाच्या आयुष्यात एक् बाबा यायला हवा,
देवानेही प्रत्येकाला दिला असतो प्रकाशाचा दिवा !
पेटवावा दिवा उजेडाकरीता न् वापरता जाळण्यासाठी,
उमगले काठी उगारण्यासाठी नसतेच असते ती फक्त सोबतीसाठी !
प्र.....साद जोशी
पुणे
०६.०७.२००९
No comments:
Post a Comment