केसरबागेची रंगपंचमी !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
मधल्या गच्चीतली होळी & रंगपंचमी आता कुणालाच खेळता येणार नाही !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
खरे तर त्याही वेळी दोन वेगळ्या इमारती होत्याच की ,
पण त्यावेळी मधला जिना दोन्ही बाजूंना जोडणारा होता !
आताही दोन विंग आहेत पण जोडणारा जिना मात्र .......
आज कुणी कुणाला हक्कानी खाली बोलावेल कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
नंदाकाकू , मंजिरीकाकू , माधवीवहिनी,किर्ती, भारती ,सगळ्या बायकांना बाहेर काढायच्या ,
मकवाना आंटी, घुगरे काकू , हर्डीकर वहिनी आडून आडून का होईना पाणी ओतायच्या !
सुशील, अल्ल्या, बाबू, मी , अनिरुद्ध , मंदार सगळ्या काका लोकांना बाहेर काढायचो,
फक्त टिळा टिळा म्हणत बादल्या उलट्या करायचो , आता काकांवर हक्क गाजवावा असे काका उरले आहेत कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
बराच वेळ झाला की राधा सदन मधून आपल्यावर आणि इकडून त्यांच्यावर मारा व्हायचा ,
आज मया , निनाद , राजेश , रत्ना , मिनारदादा बाहेर तरी पडतील कां हो ?
सगळे रंग अन् पाणी संपल्यावर पंडितच्या बाजूच्या त्या जुनाट पिम्पातली माती फेकायचो ,
आज स्वामी नारायण मध्ये येणाऱ्या लोकांच्या शिव्या खायला कुणी तयार आहे कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
कालच गुरुकृपेतल्या अरुंधतीचा मेल आला की आता आमची सद्दी संपली तरी ओंकारची टीम जोरात आहे ,
पण प्रश्न एकच आहे ??? नवे लोक जुन्या रितीत मिसळून घ्यायला तयार आहेत कां हो ?
ओंकार, निहार, रितेश, आदित्य सगळे खूप काही सगळे छान पार पडतील खात्री आहे मला ,
पण परत अजून एक प्रश्न आहेच? सगळे तसेच नीट पद्धतीने करतील नां ? गालबोट तर लागणार नाही नां ???
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
नवे सगळे झाले आहे , जुना सूर कुठेतरी हरवला आहे
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
गेलेल्यांची फ्रेम मनावर मणभर ओझे ठेवते आहे !!!
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
सचिन बेस्टच आहे पण गावस्करला विसरता येत नाही ,
स्पिन कुणीही टाकेल पण बंडा सारखा कुणाचा बॉल वळणार नाही
परत एकदा नयनीश ,मी, मया, बाबू खेळायला उतरू पण ...............
सुशील , रत्ना , मिनार चे बॉल चे छ्प्पे पाठी पोटावर घेऊन घरी कुणी जाणार नाही !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
आजच्या केसरबागेला बोक्याचा सलाम
आमच्या त्या वाडीला कायमचा अलविदा !
गांधीशी परत KUM ची मीटिंग होईलही
गांधी म्हणजे काय ते सांगायला कुणीही उतरणार नाय .......
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
विली, बिपीन नंदू आणि आनंद काका आता हातात oil paint घेऊन असणार नाहीत ,
घरी अंग साफ करायला & शिव्या घालायला रॉकेलच्या बाटलीसोबत आई वाट पहाणार नाय !
मी आता मागच्या डायर्या फाडायला सुरुवात केली आहे ,
नवी विटी नवे राज्य , कुणीतरी नवी डायरी लिहायला सुरुवात करायला पायजे हाय !
प्र......साद जोशी .
No comments:
Post a Comment