कशाला कुणा द्यायचे वचन सुखी असल्याचे ?
आपले भोग तर आपणच भोगायचे असतात
जर माझे भोग मीच भोगणार असेन तर
माझे हसूसुद्धा मीच ठरवेन कधी हसायचे ते !
परवाच सुखी माणसाचा सदरा घातलेला माणूस भेटला मला
त्याच्या सदरयालाही नजर लागली आहे असे म्हणत होता
सदरा काही बदलला नाहीये त्याचा अजिबात पण
अपेक्षांचा खिसा सुख कमी करतोय म्हणाला !
मी गालातल्या गालात हसल्यावर चिडला माझ्यावर
म्हणे कदाचित आपल्यापैकीच कुणाचीतरी नजर लागली असेल असे म्हणाला
खरे सांगू मी त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत नाही पडलो
आरसा पाहिला होता थोड्याच वेळापूर्वी त्यामुळे माझे अस्तिव मला स्पष्ट ठाऊक होते !
माझ्या जगातल्या प्रत्येकासमोर खळखळून हसतो मी
अंतरीच्या गोष्टींना कधीच चेहऱ्यावर दिसू देत नाही मी
कमीतकमी हसू पाहिल्यावर माझ्यासमोर अस्पष्टसे कां होईना हसतात काही जण
मी माझ्याच अश्रुंचे भांडवल केले तर डोळे पुसायला किती हात येतील पुढे यावर शंका आहे !
एखाददोन हात येतीलसुद्धा फक्त माझ्यासाठी
ते अश्रूंना अन् मला पुसायला असतीलच याची खात्री कशी द्यावी ?
न् पेक्षा माझे निर्झर हसणे वाटत जातो असाच वाटेवाटेवरून
माझ्या अश्रुंचे दोन थेंब अर्घ्य म्हणून पडले त्यात तर कुणाला समजणार आहे ?
प्र......साद जोशी
पुणे
१५.०५.२०१०
No comments:
Post a Comment