कशाला कुणा द्यायचे वचन सुखी असल्याचे ?
आपले भोग तर आपणच भोगायचे असतात
जर माझे भोग मीच भोगणार असेन तर
माझे हसूसुद्धा मीच ठरवेन कधी हसायचे ते !
परवाच सुखी माणसाचा सदरा घातलेला माणूस भेटला मला
त्याच्या सदरयालाही नजर लागली आहे असे म्हणत होता
सदरा काही बदलला नाहीये त्याचा अजिबात पण
अपेक्षांचा खिसा सुख कमी करतोय म्हणाला !
मी गालातल्या गालात हसल्यावर चिडला माझ्यावर
म्हणे कदाचित आपल्यापैकीच कुणाचीतरी नजर लागली असेल असे म्हणाला
खरे सांगू मी त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत नाही पडलो
आरसा पाहिला होता थोड्याच वेळापूर्वी त्यामुळे माझे अस्तिव मला स्पष्ट ठाऊक होते !
माझ्या जगातल्या प्रत्येकासमोर खळखळून हसतो मी
अंतरीच्या गोष्टींना कधीच चेहऱ्यावर दिसू देत नाही मी
कमीतकमी हसू पाहिल्यावर माझ्यासमोर अस्पष्टसे कां होईना हसतात काही जण
मी माझ्याच अश्रुंचे भांडवल केले तर डोळे पुसायला किती हात येतील पुढे यावर शंका आहे !
एखाददोन हात येतीलसुद्धा फक्त माझ्यासाठी
ते अश्रूंना अन् मला पुसायला असतीलच याची खात्री कशी द्यावी ?
न् पेक्षा माझे निर्झर हसणे वाटत जातो असाच वाटेवाटेवरून
माझ्या अश्रुंचे दोन थेंब अर्घ्य म्हणून पडले त्यात तर कुणाला समजणार आहे ?
प्र......साद जोशी
पुणे
१५.०५.२०१०
Friday, May 14, 2010
Thursday, May 13, 2010
एका आईचे आईपण
एकटी चालताना थकशील कदाचित
कधीतरी इतकी दमशील की नको वाटेल हे जगणे
पण तसे करून कधीच चालणार नाही
कारण तुझं असणे आणि जगणे तुझ्या हाती नाहीयेच मुळी !
तुला आईपणाचा कंटाळा येऊन पण चालणार नाहीये
जगानी उगाचच आईला इतके मोठेपण देऊन ठेवले आहे की
तू सुद्धा त्यातून सुटणार नाहीस कदाचित तुझी तशी इच्छाही नसेल
पण एक स्वतंत्र अस्तित्व शोधायचे असेल तर ह्या बंधनांना थोडे सैल करावे लागेल !
आईचे आईपण कधी संपते कां हो ? मोठा गमतीशीर आणि क्लिष्ट प्रश्न आहे
तुझा तुलाच सोडवायचा आहे पण सुटायचा नाही याचीसुद्धा खात्री आहे मला
मग नक्की काय करायचे असा प्रश्न पडेल तुला .....
हा प्रश्न कायमचा आहे , मुळी हा प्रश्नच नाही हा आहे तिढा .....
ह्या तिढ्याशी झुंजत झुंजतच जगायचे आहे तुला
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला
आधी नवऱ्याची आई झालीस , मग मुलांची आणि नंतर नातवंडांची
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला .. कधीच ....
प्र.....साद जोशी
पुणे
१४.०५.२०१०
कधीतरी इतकी दमशील की नको वाटेल हे जगणे
पण तसे करून कधीच चालणार नाही
कारण तुझं असणे आणि जगणे तुझ्या हाती नाहीयेच मुळी !
तुला आईपणाचा कंटाळा येऊन पण चालणार नाहीये
जगानी उगाचच आईला इतके मोठेपण देऊन ठेवले आहे की
तू सुद्धा त्यातून सुटणार नाहीस कदाचित तुझी तशी इच्छाही नसेल
पण एक स्वतंत्र अस्तित्व शोधायचे असेल तर ह्या बंधनांना थोडे सैल करावे लागेल !
आईचे आईपण कधी संपते कां हो ? मोठा गमतीशीर आणि क्लिष्ट प्रश्न आहे
तुझा तुलाच सोडवायचा आहे पण सुटायचा नाही याचीसुद्धा खात्री आहे मला
मग नक्की काय करायचे असा प्रश्न पडेल तुला .....
हा प्रश्न कायमचा आहे , मुळी हा प्रश्नच नाही हा आहे तिढा .....
ह्या तिढ्याशी झुंजत झुंजतच जगायचे आहे तुला
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला
आधी नवऱ्याची आई झालीस , मग मुलांची आणि नंतर नातवंडांची
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला .. कधीच ....
प्र.....साद जोशी
पुणे
१४.०५.२०१०
Subscribe to:
Comments (Atom)