सांजवेळ ही अजुनी कातर ,
जीवघेणी दररोज येते
मग सरता सरता रात्र ही उरते ,
पहाटेची रोज वाट पाहते !
सतत असतो तुझाच वावर ,
मनातील सर्व मनातच रहाते
मग खांबामागुन लपून पहाते ,
उन्हे रोजची किलबिल न्हाते !
मी तर वेडा या तीरावर ,
पारावर ती बसून रडते
लांब सावली पडते जेव्हा
अश्रुपुरात ती नदी थांबते !
वहात जातो पैलतीरावर ,
गात्रागात्रातुनी रक्तही थिजते
मागमूस ना काही उरतो
मम श्वासांचे बंधन संपते !
शेवट उरतो एकच काहूर
नदीला मग येतो गहिवर
नेते मजला मातीसंगत
ध्यान, समाधी, थडगे उरते !
जाणे येणे रोजचेच ते ,
वहिवाट ही रोजचीच ती
लिंपण होते थडग्यावरी
सुकल्या अश्रुंचे ते प्राजक्त होते !
प्र.....साद जोशी.
२२.०२.२०१०
पुणे
Monday, February 22, 2010
Sunday, February 21, 2010
तसे आता सगळेच बदलले आहे !
तसे आता सगळेच बदलले आहे !
तसे आता सगळेच बदलले आहे,
मन मात्र काहीच मानत नाहीये ,
गुडघ्यापर्यंत पाण्यातून पाऊस पडताना
गटाराच्या पाण्यातून केसरबागेची सुरुवात होते कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला ती कचरापेटीच्या केबिन आठवत आहे कां ?
केबिन उचलून नेली असेल तरी
आतल्या आठवणी मनातून जाताहेत कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
इंदिरा स्मृती आणि अमृतानुभव कुणाला आठवेल कां ?
बिल्डींग काही दिवसात पडली आणि तिथले मोकळे ग्राउंड काही काळासाठी परत आले
दारातून आत येताना येणारा चाफ्याचा आणि बुचाच्या फुलांचा वास दरवळतो आहेच नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अजूनही लांब रन अप घेऊन कुणी बोलिंग टाकते कां हो ?
काचा फुटल्यावर वाला मधून कुणी भरून आणून देते कां ?
रस्ते कितीही बनवले तरीही राधा सदन समोरील बुजलेले स्टंपची भोके मनात तशीच आहेत नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अख्खी गुरुकृपा देवधर आणि मटंगे यांचे भांडण मिस करत असेल नां ?
श्रीनिवास म्हणे आता मोठ्ठी बिल्डींग होणार मग त्यावरून बॉल जाणार कसा ?
सगळेच कॉम्पुटर वर बसल्यावर क्रिकेट कुणी तरी खेळत असेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला आठवेल २४ डिसेंबरचा फन फेअर आणि बाबूचा वाढदिवस आठवेल कां ?
गणपतीच्या आदल्या रात्री सुशीलदादा स्टेशन वर नेवून चहा कुणाला पाजेल हो ?
रात्रभर कॅरम खेळत कुणी गणपतीशी कुणी जगायला तयार तरी असेल कां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मान्य आहे मला बदल ही प्रगतीची पाऊलवाट आहे
केसरबाग कधी वाडी होती , तिची कॉलोनी कधी झाली ?
कुणाला कधी वाडीची आपुलकी कॉलोनी मध्ये मिळेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
ए काकू , ओ काका कधी अंकल आणि आंटी झाले समजलेच नसेल
शिट्टी वाजवून बोलावणे गेले आता अन् मोबाईलचा एक रिंग देणे उरले
आयला , च्यायला फार दूर गेले त्यातलाही आपलेपणा आता कुठे सापडेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मी मात्र अजून तसाच वेडा आहे , केसरबागेत बॉक्स क्रिकेट शोधतोय
बाबू, शाम्प्या ,बापंडी, मुन्नाला खेळायला हाक मारत फिरतोय उगीच
भरून द्यायला खिशात पैसे पण आहेत , फुटायला काचा कुठे आहेत हो ?
पण
तसे आता सगळेच बदलले आहे,
बंडू विकेट कीपिंग करायला आहे कुठे ?
सुऱ्या, रवी, फील आणि जग्गू बोलिंग करायला आहेत कुठे ?
मी पण आहे , ते पण सगळे आहेत ........................
केसरबागेचे केसरबागपण हरवले आहे कुणाला कुठे सापडेल कां हो ?
ए मंदार , ए समीर , ए मोहित , ए मया
सगळ्यांना हाका मारून झाल्या ,
जोरात लांबून एक हाक आली
ए बोक्या ................
आता केसरबाग तुझी नाही राहिली रे बाबा ...आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
खरेच मी आता नाही राहिलो तिथला .....
माणसे तीच आहेत पण आपलेपण ?
जागाही तश्याच आहेत तिथल्या
पण .........आता सगळेच बदलले आहे !!!
तसे आता सगळेच बदलले आहे,
प्र.......साद जोशी.
पुणे ??? मुलुंड ???
तसे आता सगळेच बदलले आहे,
मन मात्र काहीच मानत नाहीये ,
गुडघ्यापर्यंत पाण्यातून पाऊस पडताना
गटाराच्या पाण्यातून केसरबागेची सुरुवात होते कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला ती कचरापेटीच्या केबिन आठवत आहे कां ?
केबिन उचलून नेली असेल तरी
आतल्या आठवणी मनातून जाताहेत कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
इंदिरा स्मृती आणि अमृतानुभव कुणाला आठवेल कां ?
बिल्डींग काही दिवसात पडली आणि तिथले मोकळे ग्राउंड काही काळासाठी परत आले
दारातून आत येताना येणारा चाफ्याचा आणि बुचाच्या फुलांचा वास दरवळतो आहेच नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अजूनही लांब रन अप घेऊन कुणी बोलिंग टाकते कां हो ?
काचा फुटल्यावर वाला मधून कुणी भरून आणून देते कां ?
रस्ते कितीही बनवले तरीही राधा सदन समोरील बुजलेले स्टंपची भोके मनात तशीच आहेत नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अख्खी गुरुकृपा देवधर आणि मटंगे यांचे भांडण मिस करत असेल नां ?
श्रीनिवास म्हणे आता मोठ्ठी बिल्डींग होणार मग त्यावरून बॉल जाणार कसा ?
सगळेच कॉम्पुटर वर बसल्यावर क्रिकेट कुणी तरी खेळत असेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला आठवेल २४ डिसेंबरचा फन फेअर आणि बाबूचा वाढदिवस आठवेल कां ?
गणपतीच्या आदल्या रात्री सुशीलदादा स्टेशन वर नेवून चहा कुणाला पाजेल हो ?
रात्रभर कॅरम खेळत कुणी गणपतीशी कुणी जगायला तयार तरी असेल कां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मान्य आहे मला बदल ही प्रगतीची पाऊलवाट आहे
केसरबाग कधी वाडी होती , तिची कॉलोनी कधी झाली ?
कुणाला कधी वाडीची आपुलकी कॉलोनी मध्ये मिळेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
ए काकू , ओ काका कधी अंकल आणि आंटी झाले समजलेच नसेल
शिट्टी वाजवून बोलावणे गेले आता अन् मोबाईलचा एक रिंग देणे उरले
आयला , च्यायला फार दूर गेले त्यातलाही आपलेपणा आता कुठे सापडेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मी मात्र अजून तसाच वेडा आहे , केसरबागेत बॉक्स क्रिकेट शोधतोय
बाबू, शाम्प्या ,बापंडी, मुन्नाला खेळायला हाक मारत फिरतोय उगीच
भरून द्यायला खिशात पैसे पण आहेत , फुटायला काचा कुठे आहेत हो ?
पण
तसे आता सगळेच बदलले आहे,
बंडू विकेट कीपिंग करायला आहे कुठे ?
सुऱ्या, रवी, फील आणि जग्गू बोलिंग करायला आहेत कुठे ?
मी पण आहे , ते पण सगळे आहेत ........................
केसरबागेचे केसरबागपण हरवले आहे कुणाला कुठे सापडेल कां हो ?
ए मंदार , ए समीर , ए मोहित , ए मया
सगळ्यांना हाका मारून झाल्या ,
जोरात लांबून एक हाक आली
ए बोक्या ................
आता केसरबाग तुझी नाही राहिली रे बाबा ...आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
खरेच मी आता नाही राहिलो तिथला .....
माणसे तीच आहेत पण आपलेपण ?
जागाही तश्याच आहेत तिथल्या
पण .........आता सगळेच बदलले आहे !!!
तसे आता सगळेच बदलले आहे,
प्र.......साद जोशी.
पुणे ??? मुलुंड ???
Subscribe to:
Comments (Atom)