कुठल्याही शहराचा एखादा चेहरा बघायचा म्हणजे नेमकी काही ठिकाणं आहेत
जिथंअंदाजे दोन ते तीन तास किंवा फारतर एखाद दिवस घालवायला लागतात आणि या
कालावधीतआपल्याला त्या शहराचा किंवा स्थळाचा एक प्रार्थमिक अंदाज येतो,
सहसा यासुरुवातीच्या अंदाजाच्या पाचदहा टक्के इकडेतिकडे सोडलं तर अंदाज
चुकत नाही अर्थातहे माझं निरीक्षण आहे आणि मी स्वतः परीक्षण समीक्षण
करण्यापेक्षा निरीक्षणकरण्यावर भर देतो कारण निरीक्षणात बदल करणे अत्यंत
सोप्पे असतं ते परीक्षण किंवासमीक्षणात शक्य नसते.
या परीक्षेत सगळ्यात सोप्पं ठिकाण म्हणजे त्या ठिकाणाचा एखादा तरुणाईचा (तरुणाईचासरळसरळ अर्थ वय असा घेऊ नये इथं मनाची अवस्था अपेक्षित आहे म्हणजे जी त्या तिथल्यालोकांच्यात आपल्याला दिसते ती किंवा आपल्याला दिसते म्हणण्यापेक्षा भावते तीतरुणाई मला अपेक्षित आहे) एखादा नाका किंवा चौक अथवा कट्टा आपल्याला सहज मदत करतो.इथे व्यक्त होणारी सगळी मतं हे अत्यंत वैयक्तिक असतात आणि अगदी प्रभाव असलाच तर तोतिथल्याच कुठल्याश्या एका दृष्टिकोनाचा असतो यापलीकडे कुणाचाही किंवा कुठल्याही(अ)राजकीय तत्वांचा या मतांवर प्रभाव नसतो सहसा.
मी ज्या शहरात मुख्यत्वे वास्तव्य केलं त्यापैकी एक म्हणजे मुंबई आणि मुंबईचानाका याबाबत सांगायचे तर नाका ही एक संस्कृती वगैरे नाहीये अजिबात कारण घरातल्याजागेच्या व्यस्त प्रमाणात असलेल्या लोकसंख्येमुळे मत प्रदर्शित करण्याचे हमखासठिकाण म्हणजे नाका आणि सोबतीनं घरात चालत नाहीत अशी कृत्ये आणि भाषा या दोन्हींचासढळ हस्ते (मुखे) वापर करता येतो ती जागा म्हणजे नाका.
सरकारने कितीही प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम राबवले तरी आणि तरीही नाक्यावर जी काहीशिक्षणपद्धती राबवली जाते याला तोड नाही कारण इथं येवून सख्खे नातेवाईक देखील फक्तआणि फक्त नाक्यावरचे सोबती असते आणि यामुळे मतप्रदर्शन खूप सुलभ होते ज्यामुळेआपापल्या दृष्टीने असेलेली आवड (निवड) ही सहजपणे घराच्या उंबऱ्यापर्यंत पोचवतायेते. एखाद्या व्यक्तीला आपण लहान समजत असणे या मताबद्दल एखाद्या क्षणी अलगत सदरव्यक्ती मोठी झाली आहे अश्या मतपरिवर्तनात नाका फार मोठी मोलाची कामगिरी पारपाडतो. तसंच घरातल्या अनेक लोकांना आपला पिंट्या किंवा आपली छकुली सध्या नेमक्याकाय विचारप्रवाहात आहे याचे नेमके ठोकताळे इथं आणि फक्त इथंच ध्यानात येऊ शकतात.
अर्थात एखाद्या शक्यतेत विचारांना लागणारे अनाठायी वळण किंवा गैरसमजूतसुध्दा इथंचदूर करता येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार नामक भ्रामक कल्पना जरकुणी उराशी बाळगून आपल्या स्वतःच्या घरात हुकुमशाही करत असेल तर त्या त्याव्यक्तींना आपापल्या घरातल्या होऊ शकणाऱ्या किंवा होऊ घातलेल्या बंडाची आगाऊसुचनादेखील इथंच नेमकेपणे कळू शकते
मुंबईच्या नाकावरून खरं तर एखाद्या शब्दकोषात पानं कमी पडतील इतक्या मुबलकप्रमाणात शब्दसंचय मिळू शकतो आणि त्याहूनही जास्त प्रमाणात लिखाण होऊ शकतं पण जागामिळाली म्हणून मुबलक पसरापसरी करण्याचा मुंबईचा स्वभाव नाही आणि मलाही तसंचवागायला हवं.
कोकणात नाका अशी निराळी संस्कृती मुळीच नाही किंबहुना कोकणाला तशी आवश्यकताचभासत नाही कारण किमान दोन आणि कमाल कितीही टाळकी जमली की असतील त्या ठिकाणी चर्चा,परिसंवाद किंवा भाषणे झडू शकतात कोकणात.
मुळात कोकणातल्या लोकांबाबत इतर प्रांतातील लोकांना असेलेली असूया हेच मुळीकोकणाबाबत असलेल्या गैरसमजुतीचे मूळ कारण आहे.
निवांतपणे आयुष्य जगता येऊ शकतं ही कोकण सोडून इतरप्रांतीयांना कविकल्पना वाटतअसल्याने ह्या कल्पनेचा आविष्कार झाला असावा असं माझं मत आहे आणि मत मांडण्यासाठीमुंबई पुणे किंवा कोकण यांची मक्तेदारी अजिबात नाही असलीच तर ती दिल्लीत असेलमात्र भारतात दिल्ली नामक एखादा देश असल्याचे समस्त कोकणवासियांचे प्रार्थमिक आणिअंतिम मत आहे.
असो माझ्यातल्या कोकणवासियाला जागृत केल्यागत मी चार अवकाशयाने एकमेकांना जिथंभेटण्याची शक्यता आहे अश्या ठिकाणीसुध्दा कुवत असलेल्या माणसासारखं मला आत्तातरीबोलण्याची गरज अजिबातच नाही कारण एखादा शिगवण आणि एखादा जोशी हे जितक्या त्वेषानेगावात द्वेषाने वार्तालाप करत असतील तेच दोघे मुंबईत एकाच नाक्यावर आपापल्या परीनेकोकण किती गुणवंतांनी भरलेला आहे याबाबत एक होऊन भांडण करताना दिसतील.
तर मूळ विषयाला अजिबात बगल न देता चिकाटीने आहे तोच विषय चघळून चघळून बोलण्याचीजागा म्हणजे कोकणातल्या कुठल्याही गावाचा चौक (पूर्वीच्या सिनेमा वगैरेमधून जरतुम्ही चावडी असं काहीबाही मनात ठेवलं असेल तर आधीच सांगतो कोकणात असं काहीही आढळतनाही. कोकणातल्या कुठल्याही गावात आता कुणीही अनुनासिक वगैरेदेखील बोलत नाही (जरआढळलेच अगदी तर समजा की कुणी पुणेकर कोकणप्रेमापोटी भेट द्यायला आले आहेत) तर मूळविषयाडून न भरकटण्याची हमी म्हणजे कोकणातला चौक.
आजचा डॉलररेट ते कमी स्पीडचा इंटरनेट यापैकी कुठलेही विषय तुम्हाला कोकणातल्या चौकाचौकातदिसू शकतात पण एक नक्की इथं मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर जर कां तुम्ही कुठलेनिष्कर्ष काढणार असाल तर तसं चुकुनही करू नका कारण दोन फुटाच्या खड्ड्याला कुत्रीमुतण्याची जागा ते गावाचे तळे असं काही म्हणजे काहीही ऐकण्याची तयारी जर असेल तरइथं विश्वास ठेवावा कारण कोकणात ऐकीव आणि बघितलेल्या या दोन्ही गोष्टीत स्त्री तेपुरुष इतकी तफावत आढळू शकते.
पण एका खरं चौकाचौकात घडणाऱ्या गमतीजमतीमुळे या कोकणातल्या रोजच्या जीवनात एकवेगळा बहार येतो नाहीतर मला सांगा चार दिवसाआड एकदा येणारे पाणी, पर्यटकांमुळेयेणारा पैसा व त्यासोबत वाढणारा कचरा आणि चोवीस तासात सुर्याहून कमी वेळ टिकणारीशासनाची वीज यामध्ये माणसांनी विरंगुळा शोधायचा तो कुठं ?
कोकण आणि मुंबई यांच्या नाका आणि चौकाबाबत बोलून आणि लिहून झालं पण पुणे येथीलकट्टा आणि टपरीवरच्या गप्पा आणि त्याच्या विश्लेषणासाठी मला वेगळी सवड लागेल आणिते वेगळेपण टिपायला वेगळा मजकूरसुध्दा कारण पुणेरी कट्टा याबाबत लिहायचे म्हणजे निराळेपणसिध्द करण्यासाठी निराळेपण हवे, आता इथं तसदीखेरीज काहीही द्या असं सांगणारे मैत्रआहेत त्यांच्यासाठी वेगळे लिहिणेच रास्त ठरेल.
क्रमशः
या परीक्षेत सगळ्यात सोप्पं ठिकाण म्हणजे त्या ठिकाणाचा एखादा तरुणाईचा (तरुणाईचासरळसरळ अर्थ वय असा घेऊ नये इथं मनाची अवस्था अपेक्षित आहे म्हणजे जी त्या तिथल्यालोकांच्यात आपल्याला दिसते ती किंवा आपल्याला दिसते म्हणण्यापेक्षा भावते तीतरुणाई मला अपेक्षित आहे) एखादा नाका किंवा चौक अथवा कट्टा आपल्याला सहज मदत करतो.इथे व्यक्त होणारी सगळी मतं हे अत्यंत वैयक्तिक असतात आणि अगदी प्रभाव असलाच तर तोतिथल्याच कुठल्याश्या एका दृष्टिकोनाचा असतो यापलीकडे कुणाचाही किंवा कुठल्याही(अ)राजकीय तत्वांचा या मतांवर प्रभाव नसतो सहसा.
मी ज्या शहरात मुख्यत्वे वास्तव्य केलं त्यापैकी एक म्हणजे मुंबई आणि मुंबईचानाका याबाबत सांगायचे तर नाका ही एक संस्कृती वगैरे नाहीये अजिबात कारण घरातल्याजागेच्या व्यस्त प्रमाणात असलेल्या लोकसंख्येमुळे मत प्रदर्शित करण्याचे हमखासठिकाण म्हणजे नाका आणि सोबतीनं घरात चालत नाहीत अशी कृत्ये आणि भाषा या दोन्हींचासढळ हस्ते (मुखे) वापर करता येतो ती जागा म्हणजे नाका.
सरकारने कितीही प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम राबवले तरी आणि तरीही नाक्यावर जी काहीशिक्षणपद्धती राबवली जाते याला तोड नाही कारण इथं येवून सख्खे नातेवाईक देखील फक्तआणि फक्त नाक्यावरचे सोबती असते आणि यामुळे मतप्रदर्शन खूप सुलभ होते ज्यामुळेआपापल्या दृष्टीने असेलेली आवड (निवड) ही सहजपणे घराच्या उंबऱ्यापर्यंत पोचवतायेते. एखाद्या व्यक्तीला आपण लहान समजत असणे या मताबद्दल एखाद्या क्षणी अलगत सदरव्यक्ती मोठी झाली आहे अश्या मतपरिवर्तनात नाका फार मोठी मोलाची कामगिरी पारपाडतो. तसंच घरातल्या अनेक लोकांना आपला पिंट्या किंवा आपली छकुली सध्या नेमक्याकाय विचारप्रवाहात आहे याचे नेमके ठोकताळे इथं आणि फक्त इथंच ध्यानात येऊ शकतात.
अर्थात एखाद्या शक्यतेत विचारांना लागणारे अनाठायी वळण किंवा गैरसमजूतसुध्दा इथंचदूर करता येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार नामक भ्रामक कल्पना जरकुणी उराशी बाळगून आपल्या स्वतःच्या घरात हुकुमशाही करत असेल तर त्या त्याव्यक्तींना आपापल्या घरातल्या होऊ शकणाऱ्या किंवा होऊ घातलेल्या बंडाची आगाऊसुचनादेखील इथंच नेमकेपणे कळू शकते
मुंबईच्या नाकावरून खरं तर एखाद्या शब्दकोषात पानं कमी पडतील इतक्या मुबलकप्रमाणात शब्दसंचय मिळू शकतो आणि त्याहूनही जास्त प्रमाणात लिखाण होऊ शकतं पण जागामिळाली म्हणून मुबलक पसरापसरी करण्याचा मुंबईचा स्वभाव नाही आणि मलाही तसंचवागायला हवं.
कोकणात नाका अशी निराळी संस्कृती मुळीच नाही किंबहुना कोकणाला तशी आवश्यकताचभासत नाही कारण किमान दोन आणि कमाल कितीही टाळकी जमली की असतील त्या ठिकाणी चर्चा,परिसंवाद किंवा भाषणे झडू शकतात कोकणात.
मुळात कोकणातल्या लोकांबाबत इतर प्रांतातील लोकांना असेलेली असूया हेच मुळीकोकणाबाबत असलेल्या गैरसमजुतीचे मूळ कारण आहे.
निवांतपणे आयुष्य जगता येऊ शकतं ही कोकण सोडून इतरप्रांतीयांना कविकल्पना वाटतअसल्याने ह्या कल्पनेचा आविष्कार झाला असावा असं माझं मत आहे आणि मत मांडण्यासाठीमुंबई पुणे किंवा कोकण यांची मक्तेदारी अजिबात नाही असलीच तर ती दिल्लीत असेलमात्र भारतात दिल्ली नामक एखादा देश असल्याचे समस्त कोकणवासियांचे प्रार्थमिक आणिअंतिम मत आहे.
असो माझ्यातल्या कोकणवासियाला जागृत केल्यागत मी चार अवकाशयाने एकमेकांना जिथंभेटण्याची शक्यता आहे अश्या ठिकाणीसुध्दा कुवत असलेल्या माणसासारखं मला आत्तातरीबोलण्याची गरज अजिबातच नाही कारण एखादा शिगवण आणि एखादा जोशी हे जितक्या त्वेषानेगावात द्वेषाने वार्तालाप करत असतील तेच दोघे मुंबईत एकाच नाक्यावर आपापल्या परीनेकोकण किती गुणवंतांनी भरलेला आहे याबाबत एक होऊन भांडण करताना दिसतील.
तर मूळ विषयाला अजिबात बगल न देता चिकाटीने आहे तोच विषय चघळून चघळून बोलण्याचीजागा म्हणजे कोकणातल्या कुठल्याही गावाचा चौक (पूर्वीच्या सिनेमा वगैरेमधून जरतुम्ही चावडी असं काहीबाही मनात ठेवलं असेल तर आधीच सांगतो कोकणात असं काहीही आढळतनाही. कोकणातल्या कुठल्याही गावात आता कुणीही अनुनासिक वगैरेदेखील बोलत नाही (जरआढळलेच अगदी तर समजा की कुणी पुणेकर कोकणप्रेमापोटी भेट द्यायला आले आहेत) तर मूळविषयाडून न भरकटण्याची हमी म्हणजे कोकणातला चौक.
आजचा डॉलररेट ते कमी स्पीडचा इंटरनेट यापैकी कुठलेही विषय तुम्हाला कोकणातल्या चौकाचौकातदिसू शकतात पण एक नक्की इथं मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर जर कां तुम्ही कुठलेनिष्कर्ष काढणार असाल तर तसं चुकुनही करू नका कारण दोन फुटाच्या खड्ड्याला कुत्रीमुतण्याची जागा ते गावाचे तळे असं काही म्हणजे काहीही ऐकण्याची तयारी जर असेल तरइथं विश्वास ठेवावा कारण कोकणात ऐकीव आणि बघितलेल्या या दोन्ही गोष्टीत स्त्री तेपुरुष इतकी तफावत आढळू शकते.
पण एका खरं चौकाचौकात घडणाऱ्या गमतीजमतीमुळे या कोकणातल्या रोजच्या जीवनात एकवेगळा बहार येतो नाहीतर मला सांगा चार दिवसाआड एकदा येणारे पाणी, पर्यटकांमुळेयेणारा पैसा व त्यासोबत वाढणारा कचरा आणि चोवीस तासात सुर्याहून कमी वेळ टिकणारीशासनाची वीज यामध्ये माणसांनी विरंगुळा शोधायचा तो कुठं ?
कोकण आणि मुंबई यांच्या नाका आणि चौकाबाबत बोलून आणि लिहून झालं पण पुणे येथीलकट्टा आणि टपरीवरच्या गप्पा आणि त्याच्या विश्लेषणासाठी मला वेगळी सवड लागेल आणिते वेगळेपण टिपायला वेगळा मजकूरसुध्दा कारण पुणेरी कट्टा याबाबत लिहायचे म्हणजे निराळेपणसिध्द करण्यासाठी निराळेपण हवे, आता इथं तसदीखेरीज काहीही द्या असं सांगणारे मैत्रआहेत त्यांच्यासाठी वेगळे लिहिणेच रास्त ठरेल.
क्रमशः