प्रतीबिम्बात अस्तिव दिसे ,
न कळे कधी कुणा काय मनी वसे !
स्वत्वाचा शोध जर खोल घेशी ,
तव हृदयी तुजला तव मम गवसे !
ठाव हृदयाचा कधीच कुणा न कळला ,
कधी तो चुकला अन् कधी गवसला !
जो वरी समजे आज समजला ,
क्षण हातचा कधीच निसटला !
पारयापरी हे कायमचे पुसटसे क्षण ,
धावू पाहता निसटुनी जाती !
काळालाही बघ थांब म्हणावे ,
हाती उरती फक्त वाळूचे कण !
अर्थ आंधळ्या मनतळाचे ,
कुणा न् उमगले आजवरी !
हृदयाचा ह्या कां बांध फुटावा ,
स्वत:चेच कां रडू यावे ?
प्र....साद जोशी.
पुणे
२९.०६.२०१०